Please use this identifier to cite or link to this item:
http://localhost:8080/xmlui/handle/123456789/208| Title: | वाचाल तर समृद्ध व्हाल ,वाचनातून व्यक्तिमत्व विकास -प्रा.डॉ.भाऊसाहेब नन्नावरे |
| Other Titles: | वाचन प्रेरणा दिन 15 oct 2024 |
| Authors: | library |
| Keywords: | 15 oct |
| Issue Date: | 15-Oct-2024 |
| Publisher: | library |
| Abstract: | तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे द.ग.तटकरे महाविद्यालय तळा येथे मराठी विभाग व ग्रंथालय विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस म्हणून वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. मंगळवार दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. यादव यांच्या वतीने एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. व ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन भरण्यात आले होते. त्यामध्ये ग्रंथप्रदर्शन भरवणे का महत्वाचे आहेत. व त्यावा विद्यार्थ्यांना कसा उपयोग होतो. तसेच एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म प्रवास ते राष्ट्रपती राष्ट्रपती पदापर्यंत प्रवास याविषयी थोडक्यात माहिती महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. मनोज वाढवळ यांनी दिली. या ग्रंथप्रदर्शनामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांची पुस्तके तसेच सामाजिक, राजकीय, कथा, कादंबरी, नाटक, प्रेरणादायी, विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य अर्थव्यवस्था, चरित्र, आत्मचरित्र, विश्वकोश अनेक मराठी साहित्यातील पुस्तके व विविध स्पर्धा परीक्षा विषयी पुस्तके ठेवण्यात आली होती. सायंकाळी ७.३० वाजता के. एम. सी. वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. भाऊसाहेब ननावरे यांचे “वाचाल तर समृद्ध व्हाल, वाचनातून व्यक्तिमत्व विकास“या विषयावर ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उदबोधन करताना विद्यार्थी हा वाचकप्रिय असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ग्रंथालयात जाऊन विविध विषयाची पुस्तके वाचली पाहिजेत. ज्याप्रमाणे आपण बाजारात गेल्यावर अनेक वस्तू हाताळतो. त्या प्रमाणे ग्रंथालयातील पुस्तक हातातली पाहिजे. त्यांनी मंगेश पाडगावकर यांचे या जगण्यावर शतदा प्रेम करावे ते यशवंत चव्हाण यांचे कृष्णकांठ, एपीजे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख सतीश कालेकर यांचं ग्रंथालय रोजनिशी अशा अनेक पुस्तकांची उदाहरणे देऊन मृत्युंजय नटसम्राट. अशी पुस्तके विद्यार्थिनी वाचन केली पाहिजे असे सांगितले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आज ग्रंथालय विषयी अनेक उपक्रम राबवत असतात. त्यामध्ये गाव तिथे ग्रंथालय, वाचन चळवळ, फिरते ग्रंथालय, महाबळेश्वर मध्ये भिलारे गाव पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे विद्यार्थ्यांनी भेट दिली पाहिजे. अशी अनेक उदाहरणे देऊन नव्या पिढ्यातील विद्यार्थी वाचनाकडे असा वळेल व आताचा विधार्थी तंत्रस्नेही सुद्धा असला पाहिजे. शेवटी त्यांनी सतीश काळसेकर यांचा ग्रंथाचे वाचणाऱ्याची रोजनिशी हे पुस्तक वाचल्याने विद्यार्थी कसा घडला जातो याविषयी माहिती सांगितली शेवटी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पुनम पवार यांनी केले व प्रमुख पाहुण्यांची ओळख महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री.मनोज वाढवळ यांनी केले. शेवटी प्राचार्य मनोगतात डॉ. यादव सर यांनी सुद्धा विद्यार्थी हा नेहमी ग्रंथालयाकडे वळला पाहिजे.आमचे महाविद्यालय शिक्षण सुरु असताना अनेक मराठी साहित्य व नाटक यांचे नेहमीच वाचन करत असत.तेव्हा विद्यार्थी यांनी ग्रंथालयामध्ये जाऊन अनेक ई रिसोर्सेस उपलब्ध आहेत त्याचा विधार्थी यांनी वापर करवा असे सांगितले.शेवटी डॉ. थोरात सर यांनी उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी विद्यार्थ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले. |
| URI: | http://localhost:8080/xmlui/handle/123456789/208 |
| Appears in Collections: | e content |
Files in This Item:
| File | Description | Size | Format | |
|---|---|---|---|---|
| वाचाल तर समृद्ध व्हाल ,वाचनातून व्यक्तिमत्व विकास -प्रा.डॉ.भाऊसाहेब नन्नावरे.pdf | 211.68 kB | Adobe PDF | View/Open |
Items in DSpace are protected by copyright, with all rights reserved, unless otherwise indicated.